दैनंदिन महसुलावर परिणाम : आंतरराज्य बससेवा बंद असल्याने परिणाम : कोरोनामुळे परिवहनला मागील दोन वर्षात 110 कोटीचा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यूमुळे परिवहनला दोन दिवसांच्या महसुलाला मुकावे लागत आहे. आठवडय़ातून दोन दिवस बससेवा ठप्प होत असल्याने उत्पन्न थांबत आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत.
विकेंड कर्फ्यू काळात जीवनावश्यक गोष्टींबरोबर बससेवा सुरू असली तरी प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. दरम्यान अनेक बस जाग्यावर थांबून आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षात परिवहनला 110 कोटींचा फटका बसला आहे. मागील चार महिन्यांपासून बससेवा पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने परिवहनला तोटा सहन करावा लागत आहे. गतवषी कोरोनामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला होता. दरम्यान परिवहनच्या मदतीला राज्य सरकार धावून आले होते. परिवहनच्या तांत्रिक, बसवाहक, बसचालकांच्या वेतनासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत केली होती.
परिवहनच्या स्थानिक आणि लांबपल्ल्यांच्या बस दररोज विविध मार्गांवर धावत असतात. यातून दैनंदिन 50 ते 60 लाखांचा महसूल जमा होतो. मात्र विकेंडच्या काळात मोजक्मया बस वगळता सर्वप्रकारच्या बसेस थांबून रहात आहेत. त्यामुळे शनिवार रविवारच्या महसुलापासून परिवहनला दूर रहावे लागत आहे.
बेळगाव विभागाला दोन राज्यांचा सीमा जोडल्या गेल्याने बेळगाव विभागाला अधिक उत्पन्न मिळते. बेळगाव विभागातून महाराष्ट्रासह गोव्यात धावणाऱया बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील इतर परिवहनच्या तुलनेत बेळगाव विभागाचे उत्पन्न अधिक आहे. सीमाहद्दीवर आरटीपीसीआरची सक्ती आल्याने प्रवाशांची संख्या देखील घटली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून कर्नाटक, महाराष्ट्र बससेवा ठप्प झाली आहे. शिवाय विकेंड काळात गोवा राज्याच्या बससेवेवर देखील परिणाम झाला आहे. गोवा राज्यात धावणाऱया बससेवा विस्कळीत होत आहेत. त्यामुळे परिवहनला इतर राज्यात धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न थांबले आहे.
बेळगाव विभागातील अधिक बसगाडय़ा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावत असतात. त्यामुळे बेळगाव विभागाचे उत्पन्न आंतरराज्य बससेवेवर अंबलबून आहे. मात्र कोरोना काळात आंतराज्य बससेवा विस्कळीत झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. बेळगाव विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न हे महाराष्ट्र आणि गोव्या राज्यात धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळत असते. मात्र आंतरराज्य बससेवा थांबल्याने बेळगाव विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
प्रवाशांअभावी बसेस जाग्यावर
विकेंड काळात बससेवा सुरू ठेवली जात असली तरी प्रवाशांअभावी बस जाग्यावर थांबून राहत आहेत. त्यातच कोरोनामुळे कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे महसुलावर परिणाम होत आहे. आता विकेंड कर्फ्यूचा फटका बसत आहे.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी केएसआरटीसी)