उचगांव / वार्ताहर
लॉकडाउन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी तावडे हॉटेल चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्यावतीने रास्ता रोको व विद्युत मंडळाच्या पुतळ्याचे दहन आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाचा निषेध करण्यात आला.या आंदोलनाचे नेतृत्व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले.
कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून सामान्य जनतेचा उद्योग ,रोजगार, शेती, व्यापार यांच्यावर परिणाम होऊन नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. थकित वीज बिलापोटी कोणाचेही वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये .त्यातच वीज वितरण कंपनीने जनतेला पाठवलेल्या वाढीव वीज बिलाचा शॉक बसल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने लॉकडाउन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु सध्या त्याची पूर्तता केली नाही. वीज वितरण कंपनीने तीन टप्प्यात विज बिल भरण्याचा तगादा लावला असून तो त्वरित थांबून वीज बिल माफ करावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश शिंदे यांनी दिला. तावडे हॉटेल चौकात झालेल्या या आंदोलनावेळी प्रशासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. एवढी गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम पो.उ. नि.मलमे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे, नितीन कांबळे, योगेश आजाटे, सुशांत कांबळे, अक्षय कांबळे, बाळासो कांबळे, आकाश जाधव, कुमार कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अभिजीत गोगले, आदी भीमसैनिक उपस्थित होते.