आतापर्यंत 1481 जणांनी घेतली परवानगी
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. दरम्यान धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे, जत्रा-यात्रा यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून तहसीलदार कार्यालयातून विवाह व इतर धार्मिक कार्यासाठी परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत तालुक्मयातील 1481 जणांनी विवाहासाठी परवानगी मिळविली असून इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी 50 हून अधिक जणांनी परवानगी घेतली आहे.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने राज्यात लॉकडाऊन जारी केला आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम व विवाह सोहळय़ांवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. विवाह सोहळय़ांना होणारी गर्दी टाळण्यासाठी 40 जणांना परवानगी दिली जात आहे. शिवाय विवाहकार्य सकाळी 10 च्या आतच उरकण्याचा नवीन नियम जारी करण्यात आला आहे. सध्या तहसीलदार कार्यालयात परवानगी देण्याचे काम सुरू आहे. संबंधितांना 24 मेपर्यंत परवानगी दिली जात असून त्यानंतर पुढील आदेशानुसार परवानगी दिली जाणार आहे.
पास मिळविण्यासाठी संबंधितांना विवाह समारंभाची किंवा कार्यक्रमाची तारीख, स्थळ, व पत्ता अर्जात नमूद करावा लागत आहे. शिवाय विवाहपत्रिकेची प्रत, मंगल कार्यालयाचे संमतीपत्र व आधारकार्डाची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विवाहासाठी उपस्थित राहणाऱया 40 जणांची नावे व मोबाईल नंबर नमूद करावा लागत आहेत. अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून अनुमतीपत्र दिले जात आहे.
शहरासह तालुक्मयातील नागरिकांना पास देण्याची व्यवस्था तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासून तहसीलदार कार्यालयात विवाह सोहळय़ांच्या परवानगीसाठी संबंधितांची धडपड सुरू आहे. प्रशासनाने विवाह सोहळय़ाला परवानगीची अट घातल्याने परवानगी मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी संबंधितांची धावपळ होत आहे.