ऑनलाइन टीम / मुंबई :
पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लाईट बंद करून, दिवे लावण्यास सांगितले होते. यामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला.
मात्र, काही लोक मशाली घेऊन रस्त्यावर आले. तर काहींनी फटाके फोडले. या अशा लोकांना भारताचा सलामीवीर, हिटमॅन रोहित शर्मा याने ट्विटरच्या माध्यमातून चांगलाच टोला हाणला आहे.
रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, रस्त्यावरून जल्लोष करू नका. घरातच थांबा, विश्वचषक आला अजून वेळ आहे… अशा शब्दात रोहित ने आपली निराशा व्यक्त केली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा याने याआधीही आपली जबाबदारी ओळखत कोरोना लढ्यासाठी 80 लाखांची मदत केली आहे.