आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील वेळवंड येथील महिलेच्या खून प्रकरणाला एक आठवडा उलटूनही मारेकऱयापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आह़े या परिसरातील रहिवासी व महिलेच्या नातेवाईकांची चौकशी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े मात्र कोणताही महत्वाचे धागेदोरे हाती आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े
वेलवंड येथील रजनी रविंद्र भायजे (56, ऱा वेळवंड भायजेवाडी) असे या मृत महिलेचे नाव आह़े ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आह़े अद्याप खून कशा प्रकारे करण्यात आला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आह़े मात्र पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आह़े रजनी यांचा कुणाशी वाद होता का, अथवा त्यांनी कुणाशी आर्थिक व्यवहार केला होता का याबाबत पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े
रजनी भायजे या गुरूवारी 2 एप्रिलच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांमार्फत त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. तिचा दीर सुभाष लक्ष्मण भायजे यांनी नातेवाईकांकडेही चौकशी केली, दरम्यान शुक्रवारी सायंकाळी रजनी हिचा मुलगा रविराज याला भायजेवाडीतील तीन आंबा येथील शेतजमिनीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आला. मृतदेहाचा कमरेपासून डोक्याकडील भाग ओळखण्याजोगा तर उर्वरित भाग पूर्णतः जळालेल्या अवस्थेत होता.
तीन आंबा परिसरात आढळलेला मृतदेह रजनी यांचाच असल्याची खात्री कुटुंबियांकडून करण्यात आल़ी रजनी भायजे यांचा मृतदेह जाळण्यासाठी भाताच्या पेंढय़ाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याठिकाणी रॉकेलचा कॅन व एक बॅटरी देखील आली. संशयित आरापीकडून ही आत्महत्या असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होत़ा मात्र घटनास्थळावरील परिस्थितीनुसार ही आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला होत़ा त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े