प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील व राज्यातील अपुऱया वैद्यकीय कर्मचायांच्या जनहित याचिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांनी प्रतिज्ञा पत्र सादर करून वैद्यकीय अधिकाऱयांच्या रिक्त पदांबाबत अगतिकता मांडली आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांसाठी जाहिरात निघते, पदेही भरली जातात. मात्र पात्र उमेदवार हे सरकारी रुग्णालयात काम करण्यास इच्छुक नसल्याने पदे रिक्त राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱयांच्या अपुऱया संख्येमुळे कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱयांची कमतरता जाणवत आहे. यास्तव तत्काळ वैद्यकीय अधिकाऱयांची भरती संदर्भात खलील वस्ता यांनी ऍड. राकेश भाटकर यांचे व मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर दिनांक 11 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी सरकार पक्षातर्फे हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. आयुक्त आरोग्य सेवा मुंबई या कार्यालयातील संचालक यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामधील प्रमुख मुद्दय़ांमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांच्या भरती प्रक्रियेत जानेवारी 2020 मध्ये 56 अर्ज आले होत.s त्यापैकी 23 जण कामावर रुजू झाले आहेत. तसेच मे महिन्यामध्ये सुद्धा त्यावरील भरती प्रक्रिया अद्याप पर्यंत सुरू आहे अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली. ऍड. राकेश भाटकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवत लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली व तोपर्यंत ठोस उपाय योजना केल्या जाव्यात याबाबत म्हणणे मांडले. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आठवडय़ात सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
प्रतिज्ञा पत्रातील काही प्रमुख मुद्दय़ांनुसार कोरोना कालावधीमध्ये शासनाने जिल्हाधिकारी यांना आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकार दिले आहेत. आणि त्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी व इतर ऑफिसर यांना नेमणुका देण्याची अधिकार दिलेत. सद्यस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये पाच सर्जन वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी कोरोना साठी वैद्यकीय पदे भरण्याचा निर्णय घेतला आणि जुलै महिन्यामध्ये दिलेल्या जाहिरातीत 108 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आला.r त्यातील 71 उमेदवार हजर झाले नंतर 37 उमेदवारांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये वैद्यकीय पद रिक्त असल्याबाबत दुजोरा दिला. परंतु पात्र उमेदवार हे सरकारी इस्पितळांमध्ये काम करण्यास इच्छुक नसल्याने पदे भरली जात नाहीत. तसेच वर्ग दोन तीन व चार कर्मचारी यांच्या भरती संदर्भात फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
तरीही आरोग्य विभागातर्फे न्यायालयाला असे आश्वासित करण्यात येते की जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना तात्काळ रिकामी पदे भरण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात सांगण्यात येईल. यामुळे खलील वस्ता यांच्या याचिकेवर न्यायालयाने योग्य ते आदेश पारित करावे असेही म्हटले आह.s
चौकट….
सन 2018 मधील भरतीतील 27 डॉक्टरांचे राजीनामे
भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात काही पदे निर्माण केली आहेत. त्याची जाहिरात दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी दिली व त्यामध्ये 59 अर्जदारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. परंतु फक्त 32 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली. त्यामध्ये 15 एमबीबीएस डॉक्टर आहेत. परंतु त्यातही 27 उमेदवारांनी राजीनामे दिले. त्यामुळे सध्या स्थिती चार एमबीबीएस आणि 22 स्पेशालिस्ट डॉक्टर रत्नागिरी मध्ये उपलब्ध आहेत.