प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही दिवसभर पाऊस बरसला. अधूनमधून पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे बाजारपेठेत तसेच काही ठिकाणी दलदल झाली आहे. जोरदार पाऊस नसल्यामुळे शनिवारीही साऱयांनाच पावसाचा कंटाळा आला.
जोरदार पावसानंतर मध्यंतरी पावसाने बऱयापैकी उघडीप दिली होती. त्यानंतर आता गेले दोन दिवस दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे फेरीवाले, भाजीविपेत्यांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. अशा पावसामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.