वाळपई प्रतिनिधी
गोवा सरकारने शाळेचे दहावी बारावी वर्ग सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार सत्तरी तालुक्मयातील सरकारी व खासगी शाळांचे वर्ग शनिवारपासून सुरू होणार आहेत .
मात्र याला पालकांनी विरोध केला असून जोपर्यंत विद्यालयाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होत नाही तोपर्यंत या वर्गा?ना सुरुवात करू नये अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
काही विद्यालयांनी गेल्या दोन दिवसापासून विद्यावयाच्या पातळीवर पूर्व तयारी सुरू केली असून काही शाळांमध्ये मात्र अजून पर्यंत सामासुम असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही विद्यालयांच्या शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून अशा अवस्थेत मुलांची व्यवस्था करणार का असा प्रकार सवाल पालकांनी केलेला आहे .
याबाबतची माहिती अशी की कोरोना रोगाची महामारी यामुळे गेल्या जवळपास सहा महिन्यापासून गोव्यातील सर्व शिक्षण संस्था बंद आहेत .यामुळे ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे .आठ दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने दहावी व बारावी विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत .21 नोव्हेंबरपासून या वर्गाची सुरुवात होणार असून त्यासंदर्भात निर्देश प्रत्येक विद्यालयाला देण्यात आलेले आहेत .यासंदर्भात दखल घेऊन सरकारी व खाजगी विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेले आहेत. मात्र सत्तरी तालुक्मयातील अनेक विद्यालयांच्या एकुण पूर्व तयारी संदर्भाचा आढावा घेतला असता बऱयाच शाळांमध्ये अजूनपर्यंत साफसफाई पूर्ण झालेली नसून अनेकांची शौचालये मात्र घाणीने माखलेले आहेत. अशा अवस्थेत विद्यालयाचे वर्ग सुरू करणार का अशा स्वरूपाचा सवाल पालकांनी केलेला आहे. जोपर्यंत विद्यालयाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होत नाही तोपर्यंत मुलांना पाठविणे म्हणजे धोका पत्करणे सारखे असून यामुळे शिक्षण खात्याने या संदर्भात गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारची मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच वाळपई हनुमान विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघातर्फे घेण्यात आली .यावेळी अनेक पालकांनी जोपर्यंत विद्यालयाचे निर्जंतुकीकरण होत नाही तोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठविणे अत्यंत धोक्मयाचे ठरू शकते .अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला होता. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष वामन बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक पालकांनी पूर्वतयारी संदर्भाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शाळेचे निर्जु?तिकरण करावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली. जोपर्यंत सर्व शाळेची निर्जंतुकीकरण व आवश्यक स्वरूपाची साफसफाई होत नाही तोपर्यंत मुलांना पाठविणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने गेल्या दोन दिवसातून बऱयाच प्रमाणात युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू केल्याचे माहिती हाती आली आहे.
मात्र सत्तरी तालुक्मयातील अनेक खाजगी व सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे समजते.अनेक शाळांनी अजूनपर्यंत साफसफाई हाती घेतलेली नाही. असे असताना दहावी व बारावी वर्ग सुरू करणे कितपत योग्य आहे असा भागाचा सवाल करण्यात आलेला आहे .
दरम्यान शिक्षण खात्याच्या निर्देशानुसार शनिवारपासून दहावी व बारावी शाळेचे वर्ग सुरू होणार असले तरी पालकांनी अनेक स्तरावर सुरू केलेला विरोधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुलांची कशाप्रकारे हजेरी लाभते हे पहावे लागणार आहे. यदाकदाचित मुलांचा अंशतः प्रतिसाद लाभल्यास शिक्षण खात्याला आपल्या निर्देशात नाईलाजास्तव बदल करावा लागणार असल्याचे समजते.