खानापूर / वार्ताहर
अलीकडच्या काळात शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होत चालले आहेत. जुन्या शिक्षण पद्धतीत व आजच्या शिक्षण पद्धतीत बरेच बदल असल्याने शिक्षकांनाही बराच ताण येतो. विद्यार्थ्यांना नवनवीन शिक्षणाचे आकलन देताना शिक्षकांनाही कसरत करावी लागते. यासाठी अभ्यासक्रमात येणाऱया अडचणी दूर करून त्या कशा सोडवता येईल, गुणात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कोणते क्रम हाती घेता येऊ शकतात, यासंदर्भात चर्चा विनिमय करून नवीन अभ्यासक्रमाची दिशा ठरवण्यासाठी शिक्षकांना संबंधित विषयाच्या शिक्षकांना एकत्रित करून संवाद साधने म्हणजेच विषयाची कार्यशाळा होय. अशा कार्य शाळांतून शिक्षकांनीही बरेच शिकण्यासारखे असते, असे विचार शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी पत्रकार पिराजी कुऱहाडे यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित चापगाव मलप्रभा हायस्कूल येथे शुक्रवारी कन्नड विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक टी. एल. सुतार होते.
पुढे ते म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावषी तृतीय भाषा असलेल्या कन्नड विषयाचा निकाल केवळ 70 टक्के लागला आहे. तालुक्मयात पण हा निकाल 100 टक्के लागणे अगत्याचे आहे. कन्नड विषयासाठी दिलेला अभ्यासक्रम हा अत्यंत सोपा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुण संख्येत वाढ होण्यासाठी शिक्षकांनी आपल्या विषयाचे आकलन करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास विद्यार्थ्यांची गुणात्मकता वाढेल यात शंका नाही, असे विचार मांडले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत चापगाव कन्नड शाळेचे शिक्षक एस. एल. गावडा यांनी करून या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दिपप्रज्वलन व फोटोपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. तर विद्यार्थ्यांसाठी कन्नड विषयाचे नवीन विषयवार प्रश्नावलीच्या पुस्तिकेचे प्रकाशन ग्राम पंचायतमध्ये अध्यक्ष रमेश धबाले यांच्या हस्ते झाले. यावेळी नोडल अधिकारी म्हणून बी. एस. बसरगी, संपन्नमूल्य व्यक्ती टी. आर. पत्री, एस. के. कुलकर्णी, एस. एस. पाटील होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत जे. जी. होसूर यांनी स्वागतगीताने केले. कार्यक्रामाची प्रस्तावना टी. एस. बोकडेकर यांनी करुन कार्यशाळेचा आढावा मांडला. यावेळी बोलताना ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रमेश ढवळे यांनीही या कार्यशाळेच्या नियोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. व शिक्षकांनी आपली प्रामाणिक सेवा बजावताना तालुक्मयातील गुणात्मक शिक्षण वाढवण्यासाठी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी हे विशेष प्रयत्न करत आहेत.यासाठी शिक्षकानीही सहकार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना बी. एस. बसरगी म्हणाले, आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांना सामोरे जाताना अनेक अडचणी येतात. शिक्षकांनी गुणात्मक शिक्षणासाठी अधिक भर दिला पाहिजे, असे त्याने सांगितले. मुख्याध्यापक सुतार यांनी कन्नड विषयाची कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांना एकत्रित करण्याचा सहाय्य सुयोग आपल्या हायस्कूलमध्ये मिळाला. अनेक अडचणीवर विचारविनिमय करून मुलांना फक्त शिक्षक कशाप्रकारे देता येईल, यासाठी ही कार्यशाळा लाभदायी असल्याचे विचार मांडले. यावेळी खानापूर तालुक्मयातील सर्व माध्यमिक शाळांतील कन्नड विषयाच्या फोरमचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग उपस्थित होते.