प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारचे सुधारीत शेतकरी विधेयक शेतकऱयाला उद्धवस्त करणारे आहे. हा धोका ओळखून सर्वांनी पक्ष, गट, तट भेदभाव विसरुन संघटीत विरोध करण्याची वेळ आली आहे. विधेयक हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरा, असे आवाहन पद्मश्री डॉ. गणेशदेवी यांनी केले आहे.
केंद्र सरकारने नुकतेच संसदेमध्ये सुधारीत शेतकरी विधेयक सहमत करुन घेतले. यापार्श्वभूमीवर पद्मश्री डॉ. गणेशदेवी यांनी गुरुवारी कोल्हापुरातील शेतकरी नेते, आडते, व्यापारी यांच्याशी शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी सुधारीत कायदा कसा शेतकरी विरोधी आहे. याचे सविस्तर विवेचन केले.
ते म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशाची तिजोरी तिरडीवर घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी विधेयकांसारखे विघातक विधेयके आणून तूट भरुन काढण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. मोदी, शहा, आरएसएस यांच्या खानादानात कुणी शेती केली नाही. त्यांना शेती कळत नाही, त्यांना कळते ते फक्त पैसा गोळा करणे, या विधेयकाच्या माध्यमातून राज्याला जाणार सेस केंदाकडे वळवण्याचा डाव आहे. हे ओळखले पाहिजे या विधेयकाच्या आढून राज्याची तिजेरीही खिळखिळीत करण्याचाही प्रयत्न आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 25 वर्षात इतकी कधी बेकारी आली नाही, आता शेतकरी विधेयकांमुळे बाजार समितीतील आडते, हमाल, दलाल बेकार होणार आहेत. प्रत्येक बाजार समितीतील दीड ते दोन हजार लोकांच्या नोकऱया जाणार आहेत. या कायद्यामुळे किती तास काम करावे हे बंधन काढून टाकले आहे त्यामुळे हमालांचे शोषण होणार आहे. 300 पेक्षा कमी कामगार असतील कामगार कायदा लागू होणार नाही. कंत्रटी शेतीमुळे लहान शेतकऱयाला गाशा गुंडाळावा लागाणार आहे. शेतकऱयांच्याकडील जमीनीचा ताबा बाहेर जाणार आहे. कोणतं पीक घ्यायचे याचा हक्क शेतकऱयाला राहणार नाही. शेतकरी नेत्यांनी याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. पुढील 50 वर्षात याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. तरी शेतकरी नेत्यांनी आताच शहाणं झाले पाहिचे, धोका ओळखून संघटीत विरोध करा, असे आवाहन केले.
स्वागत प्रास्ताविक प्रा. जालंदर पाटील यांनी केले. प्रा. धनाजी गुरव, सूर्यकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक दगडू भास्कर उपस्थित होते. आभार मोहन सालपे यांनी मानले.