तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथील एकाच कुटुंबातील दोघा भावंडात शेती व घर वाटणीच्या वादातून चौघांनी मिळून शिक्षक भावास जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि ११ रोजी घडली होती याबाबत दि १४ रोजी दुपारी चौघा मारेकऱ्यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतात पकडले असून त्यांना ताब्यात घेऊन अटक केले आहे.
याबाबत जखमी शिक्षक चनबसय्या गुरुमुर्ती मठपती वय ५८ यांनी फिर्याद दिली होती.फिर्यादी चनबसय्या हे घरी असताना त्यांचे भाऊ बसलिंगय्या गुरुमुर्ती मठपती हिराबाई लिंगय्या मठपती,लिंगराज बसलिंगय्या मठपती आणि चंद्रकला बसलिंगय्या मठपती हे सर्वजण अचानक घरात येऊन फिर्यादीस म्हणाले की, तुझे शेतघर आम्हाला दे, तुला नोकरी आहे आणि पगार आहे तुला कशाला शेतजमीन आणि घर पाहिजे तुला एकटाच मुलगा आहे तू पनवेल याठिकाणी घर बांधले आहेस. मग मूळ गावी असलेले घर कशाला पाहिजे असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करत होते त्यावेळी फिर्यादी हे वाटणी झाल्याप्रमाणे आपल्या हिश्याप्रमाणे घेऊ असे सांगत असताना वरील चारही संशयित आरोपींनी फिर्यादीस काठीने डोक्यावर हातावर मारून गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत दि १३ रोजी सायंकाळी फिर्यादीने चार ही मारेकऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विपीन सुरवसे, सीताराम राऊत,गजानन गायकवाड, प्रमोद शिंपाळे,शारदा हिप्परगी यांनी दि १४ रोजी दुपारी गोगांव येथील शेतात जाऊन त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.दि १५ रोजी चार ही आरोपींना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.