प्रत्येक भारतीयाने हा दिवस आपल्या आयुष्यात लक्षात ठेवावा
ऑनलाईन टीम / दैनिक तरुण भारत
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता एकमेकांचा सर्वनाश करण्यापर्यंत पोहोचले असुन यामुळे युक्रेन व रशिया यांच्यातील हवाई हल्ल्याचे व्हिडीओ आणि फोटो पाहून संपुर्ण संपुर्ण जग संबधीत राष्ट्रांच्या नागरीकांचे होणारे हाल पाहून हळहळत आहे. याचे गांभीर्य ओळखत युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरीकांना मायदेशी आणण्यासाठी प्रत्येक राष्ट्र सरसावले आहे. याच पार्श्वभुमीवर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने रोमानियाहून काही वेळापूर्वी पहिले विमान काही वेळापूर्वी मुंबईला रवाना झाले आहे, अशी माहिती विदेश मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता हे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. दरम्यान, विमानाने उड्डाण करण्यापूर्वी रोमानियातील भारतीय राजदूतांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय राजदूत विमानातील विद्यार्थ्यांना भावनिक संदेश देताना दिसत आहेत. भारताचे राजदूत राहुल श्रीवास्तव विमानात भारतीय नागरिकांना विशेष संदेश देत म्हणाले कि, संपूर्ण भारत सरकार सर्वांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र काम करत आहे.
प्रत्येक भारतीयाने हा दिवस आपल्या आयुष्यात लक्षात ठेवावा
जोपर्यंत आम्ही शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढत नाही तोपर्यंत आमचे मिशन पूर्ण होणार नाही.” तसेच त्यांनी विमानाच्या माइकवरून युक्रेनमधून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाने हा दिवस त्यांच्या आयुष्यात लक्षात ठेवण्यास सांगितले आहे. जेव्हाही आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा हा दिवस लक्षात ठेवा असे ते म्हणाले.