प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकाऱयांनी लॉकडाऊन कडक पाळण्याबाबत सूचना केल्या असून संचारबंदी आदेश असताना देखील रस्त्यावर दुचाकी घेवून विनाकारण फिरणाऱया 10 जणांवर शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी दि. 22 रोजी कारवाई केली आहे. तर रविवारी सकाळी शाहूपुरी पोलिसांनी मोती चौक, राजवाडा परिसरात केलेल्या कारवाईत 20 जणांवर कारवाई करत त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
दि. 22 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास शाहूपुरी चौकात विनाकारण फिरणाऱया सुमेधा संदीप साठे (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा), राजू विश्वनाथ लोंढे (रा. शाहूपुरी, सातारा), अनूप अशोक जगदाळे (रा. दर्शन रेसिडेन्सी, शाहूपुरी), अल्ताफ नूरमंहमद इनामदार (रा. पवाराची निगडी, ता. सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या विरुध्द हवालदार शंकर गायकवाड यांनी तक्रार दिली असून हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.
कोडोली येथील गणेश चौकात संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करत विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱया अविनाश चंद्रकांत पवार (वय 19, रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, कोडोली), मंगेश वसंत जाधव (वय 28, रा. कोडोली), यांच्यावर कारवाई करत त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल सागर शेलार यांनी तक्रार दिली आहे.
दि. 23 रोजी रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी राजवाडा, मोती चौक परिसरात संचारबंदी आदेश उल्लंघन करणाऱयांची तपासणी केली. यावेळी विनाकारण फिरणाऱया 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. दि. 25 रोजी पासून पुढे सलग सहा दिवस कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला असून नागरिकांनी स्वतःसह इतरांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन संदीप शितोळे यांनी केले आहे.