नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपदापासून पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाला दोन दशके पूर्ण झाली आहेत. यानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पियूष गोयल समवेत अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींना घटनात्मक पदावर कार्यरत असताना 20 वर्षे पूर्ण होण् हा आमच्यासाठी आनंदाचा विषय आहे. 20 वर्षांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून स्वतःच्या जबाबदाऱयांचे योग्यप्रकारे पालन केले आहे. त्यांनी जगात भारताचा मान वाढविला असल्याचे उद्गार राजनाथ यांनी काढले आहेत.
पंतप्रधान मोदींचे मी हार्दिक अभिनंदन करतो. मोदींनी सेवा आणि समर्पण हा मूलमंत्र जपला आहे. जनतेने सलग 20 वर्षांपर्यंत त्यांना स्वतःचा आशीर्वाद दिला. मोदींनी देखील एक दिवसही सुटी न घेता देशाचे नेतृत्व केले आहे. पंतप्रधान मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेत देशाचा विश्वास जिंकल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.