ऑनलाईन टीम / मुंबई
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला यावेळी लगावला.
तर सध्या राजकीय वर्तुळात स्वबळाचा जोर दिसू लागला आहे. कॉंग्रेसने वेळोवेळी स्वबळाचा नारा दिला आहे. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी जोरदार निशाणा साधला. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमाव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुका येतात जातात. हार जीत होत असते. कोण हारतं कोण जिंकतं. जिंकलं आनंद आहे. पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.” असा अप्रत्यक्षरित्या टोमणा देखील त्यांनी यावेळी लगावला.