ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासुन शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत असुन शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली असली तरी ती अद्याप ही थांबलेली नाही. दोन्ही पक्षांचे नेते विरोधी पक्षातील नेत्यांचे कारनामे बाहेर काढत आहेत. यातच सत्तेच्या लाचारीसाठी स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवावा हे राणेंकडून शिकावं असा आरोप विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे.
यापार्श्वभुमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे विरुद्ध खासदार संजय राऊत, विनायक राऊत हा सामना देखील रंगल्याचे चित्र आहे. यात एकमेकांवर निशाणा साधला जात असुन यातच आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रवेश झाला आहे. त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आरोप केले आहेत.
यावर बोलताना विनायक राऊत यांनी “केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्कारायाची. हे कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून शिकाव असे ही ते म्हणाले. तसेच एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा निश्चितच केंद्रीय पदाचा केलाला दुरुपयोग आहे. एकतर ईडीच्या नोटीसा येतील असं सांगण्याचं धाडस, करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालायतून कागदपत्रांची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल, अर्था मुंबईची ईडी गँग कशा पद्धतीने काम करते आहे. असे ते म्हणाले.
हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसद अधिवेशनात देखील त्या विरोधात आवाज उठवणार आहोत. पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम, एकतर केंद्रीयमंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालायातील कागदपत्रांची चोरी, केंद्रीयमंत्री करत असतील असा थेट संशय कालच्या ट्वीटवरून आमच्या मनात येतोय. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लावावाच लागणार. ” असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.