मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन. सरकारचे काम अंत्योदय तत्वावर. सरकार तुमच्या दारी या उपक्रमात कोणतेही राजकारण नाही. डिचोलीत सरकार तुमच्या दारी कार्यक्रम.
डिचोली/प्रतिनिधी
राज्य तसेच केंद्र सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी, आर्थिक सहाय्यतेच्या योजनांचा लाभ तसेच सरकारच्या सर्व सेवेचा लाभ समाजातील प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा आणि खऱया अर्थाने अंत्योदय तत्वावर सरकारचे कार्य व्हावे यासाठी आपण कटिबद्ध आहे. राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर सरकार लोकांच्या दारापर्यंत नेण्याचा संकल्प आपण केला होता. त्यास मंध्यतरीच्या काळात अनेक अडथळे आले असले तरी सध्या सर्वत्र होत असलेल्या या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे 150 विविध योजनांचा लाभ प्रत्येक घरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा हा आमचा हेतू असून एकाच ठिकाणी तब्बल 40 विविध सरकारी खाती त्यांचे अधिकारी या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत असून सर्व तालुका पातळीवर हा प्रयोग यशस्वी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
डिचोली व मये मतदारसंघातील जनतेसाठी आयोजित प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांटय़?, मुख्य सचिव संजीव कुमार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रविणजय पंडित, आत्माराम बर्वे तसेच एकूण चाळीस विविध सरकारी खात्यातील वरिष्ट अधिकारी व त्यांची पथके उपस्थित होती.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थिती लावताना स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक पंचायत यांचा विकास योजनांचा सविस्तर आढावा घेतला व तात्काळ अधिकारी वर्गाला आदेश देत अनेक संमस्या जागीच सोडविण्याच्या सुचना दिल्या.
राज्य सरकार हे प्रामाणिक सेवा बजावत असून आजही अनेकांना विविध योजना माहीत नाहीत. स्वयंपूर्ण मित्रच्या माध्यामातून खूप योजना चालीस लागत आहेत. या उपक्रमाबध्दल राजकारण न करता प्रत्येक घटकांचा विकास हा आपला ध्यास असून सहा महिन्यात गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने साथ द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. विकास प्रकल्प राबवताना जनतेच्या व गावाच्या हिताचे प्रकल्प आधी राबवा. दहा कलमी कार्यक्रम पूर्ण यशस्वी करण्याचे आवाहन करताना सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक घरात मिळावा यासाठी प्रत्येक घराला टोकन नंबर महिन्याभरात दिले जातील. जेणे करून वीज, पाणी, शौचालय आदी सुविधा बहाल करणे सोपे होणार आहे. केंद्र व राज्य सरकारची प्रत्येक योजना प्रत्येक घरात पोचवा असे आवाहन मुख्यमंत्र्यानी या वेळी केले.
सभापती राजेश पाटणेकर यांनी सरकार आपल्या दारी ही संकल्पना खूपच यशस्वी ठरत असून जनतेला तातडीने कामे पूर्ण होण्यास मदत होत आहे
हा कार्यक्रम सरकारने जाहीर करताच अनेक फाईल्स ज्या अडकून पडल्या होत्या त्या जलदगतीने हातावेगळय़ा करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक पंचायत व पालिका पातळीवर विकास योजना, अडलेले प्रकल्प मार्गी लागत असून विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचेही सांगितले.
आमदार प्रवीण झाटय़? यांनी मये प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून लोकांना ससरकरच्या सर्व योजना मिळाव्यात, तसेच विकासाचे सर्व प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी आजचा प्रशासन आपल्या दारी उपक्रम निश्चित फलदायी ठरेल, असे सांगितले.
बेवारशी कुत्री बेवारशी गुरे यांचा प्रश्न निकालात काढणे, मये मतदार संघातील प्रलंबित योजना, सरकारी जमीन, आदी प्रश्न निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन अधिकारी वर्गाला केले. स्वागत कुंदन फळारी यांनी केले. समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. सूत्रसंचालन दत्तप्रसाद जोग यांनी केले. मोठय़ा संख्येने लोकांनी विविध अधिकारी वर्गाशी संपर्क करून आपली कामे करून घेतली. स्वयंपूर्ण मित्रां?शी व पंचायत सरपंच यांच्याशी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी संवाद साधताना सुमारे 13 पंचयतींचा व डिचोली पालिका विभागातील विकास योजनांचा आढावा घेतला. या उपक्रमास लोकांची मोठी उपस्थिती लाभली मुख्यमंत्र्यानी सर्व ठिकाणी जाऊन खात्यातील कामाचा आढावा घेतला. लोकांशी संवाद साधताना जनतेची गाऱहाणी समजून घेतली.