भंडारी समाज युवकांचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
भडांरी समाज राजकारण्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा भंडारी समाजातील युवकांनी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना दिला आहे. स्वतःहाला समाजाचे अध्यक्ष म्हणवीणारे अशोक नाईक तसेच देवानंद नाईक यांच्या सोबत चार लोकही नाहीत. पचायतीच्या निवडणूकीत निवडून येण्याची लायकी नाही त्यांनी भंडारी समाजाने कुठल्या पक्षासोबत रहावे ते सांगू नये असे सांगताना अशोक नाईक यांनी केलेल्या घोटाळ्याचा पाडा वाचला आहे.
शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत ऍड. आदेश मांद्रेकर यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत ऍड, अनिश बकाल, उदय शिरोडकर, अदीती बकाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक समाजाला पावणीला काढतात की काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भंडारी समाजाच्या कार्यालयिन व्यवहारात मोठा घोटाळा केला आहे. भंडारी समाजाच्या नावाने विजया बँक मध्ये खाते उघडण्यात आले असताना ते ऑडीट रीपार्टमध्ये दाखविलेच नाही त्यामुळे त्या खात्यार येणाऱया पैशांचा गैर व्यवहार होत आहे असा संशय निर्माण होत आहे. असेही ऍड. मांद्रेकर यांनी सांगितले. समाजाच्याकडे केवळ 4 हजारहून कमी सदस्यांची नोंद असताना पाच लाख मते देण्याचे कुठल्या आधारे अशोक नाईक सांगतात केवळ असा प्रश्न उपस्थित केला आहे. अध्यक्ष पदाची खूर्ची जाईल म्हणून सदस्य नोंदणी करण्यासही बंदी घातली आहे. केवळ गौडबंगाल करून अध्यक्षपद मिळविले आहे. समाजाच्या प्रत्येक कामात तसेच व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोपही ऍड. अनीश बकाल यांनी केले आहेत. समाजाचे प्रमाणपत्र आपल्याकडून हरविल्याची तक्रार अनिल होबळे यांनी पोलीस स्थानकात दिली होती. नंतर अशोक नाही यांनी समाजाचे प्रमाणपत्र आपल्याकडून हरविले आहे अशी तक्रार दाखल केली होती. याचा अर्थ काय समाजाची प्रमाणपत्रे दोन आहेत की काय असा प्रश्न ऍड. बकाल यांनी उपस्थित केला आहे. समाजाच्या या गढूळ कारभारात युवावर्ग येऊ इच्छित नाही मात्र समाज पावणीसाठी काढण्याचा प्रयत्न होत असल्याने आता युवक जातीने लक्ष घालणार असल्याचेही ऍड. बकाल यांनी सांगितले.