पालकमंत्र्यांची अधिकाऱयांना सूचना : जिल्हा पंचायत सभागृहामध्ये केडीपी बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना संसर्ग आटोक्मयात आला आहे. आता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार तसेच मार्गसूचीनुसार लसीकरण करावे. खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱयांनी काम करावे, अशी सक्त ताकीद पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे.
जिल्हा पंचायतच्या सभागृहामध्ये त्रैमासिक केडीपी बैठकीत त्यांनी ही सूचना अधिकाऱयांना केली. लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. आता लसीकरणही नियोजनबद्धरीत्या करावे, असे त्यांनी सांगितले.
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लसीबाबतच्या तक्रारी आल्या नाहीत. कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी बैठकीत दिले.
बी-बियाणे, खतांची कमतरता भासू नये याची दक्षता घ्या. यापूर्वी खताचा तुटवडा झाला होता, त्याबाबत तक्रारी आल्या होत्या. तेव्हा कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी योग्य प्रकारे काम करावे, असे त्यांनी सांगितले. नदीकाठावरील गावांमधील रस्ते पुरांमुळे खराब झाले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करा. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या. इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
निधीसंदर्भात काही कमतरता भासल्यास मंत्रिमंडळामध्ये मांडून सरकारकडे पाठपुरावा करून हवा तितका निधी उपलब्ध केला जाईल. मात्र, जिह्यातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी मंत्री श्रीमंत पाटील यांनीही रस्त्यांसंदर्भात अधिक काळजी घ्या. खराब रस्त्यांमुळे अपघात घडत आहेत. तेव्हा वाहतुकीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे हातमाग, वस्त्राsद्योग व अल्पसंख्याक कल्याण विभागाचे मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.
पीक नुकसानभरपाईबाबत भेदभाव नको
पीक नुकसानभरपाई देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका. बऱयाच ठिकाणी अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा अधिकाऱयांनी कोणत्याही दडपणाखाली काम न करता ज्याचे नुकसान झाले आहे त्याला योग्य ती नुकसानभरपाई द्या, असे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले.
यावेळी खासदार इराण्णा कडाडी, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.