अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 3 ऑगस्ट 2021, स. 11.00
● सोमवारी अहवालात 622 बाधित ● एकूण 7,110 जणांची तपासणी ● पॉझिटिव्हिटी दराचा उल्लेख नाही ● आणखी निर्बंध लागले जाण्याची शक्यता ● पावसाची रिपरिप सुरूच
सातारा / प्रतिनिधी :
शनिवारी 675, रविवारी 644 आणि सोमवारी रात्रीच्या अहवालात 622 अशी सलग तीन दिवस बाधित वाढ मंदावली असल्याचा दिलासा लाभत आहे. मात्र, या तिन्ही दिवशी टेस्टिंग आठ ते सात हजाराच्या दरम्यान झालेले आहे. टेस्टिंग दहा-अकरा हजारांकडे जाते तेव्हा पुन्हा आठशेच्या पटीत बाधित वाढ सुरू असते. गेल्या दोन महिन्यापासून सातारा जिल्हावासियांच्या निरीक्षणातून हे सुटलेले नाही. राज्यात इतर जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झालेले आहे. मात्र सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात असल्याने आता आणखी निर्बंध लागले जाण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री अहवालात 622 बाधित
मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात सलग तिसऱ्या दिवशी बाधित वाढ कमी झाल्याचा दिलासा लाभला असून, सोमवारी रात्रीच्या अहवालात आलेल्या माहितीनुसार एकूण 7,110 जणांची तपासणी झाली असून, यामध्ये 622 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती याची नोंद नाही.
सोमवारी मुक्तीचा आलेख उंचावला
गेल्या आठवडाभरात ज्या पद्धतीने तीन अंकी संख्येने बाधित वाढ होत आहे. मात्र बाधित वाढीच्या प्रमाणात कोरोना मुक्ती होत नाही. त्यामुळे उपचारार्थ रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र सोमवारी सायंकाळी 1,237 जणांना घरी सोडण्यात आले कोरोना मुक्तीचा आलेख उंचावलाचा दिलासाही लाभला.
पावसाची रिपरिप अन् सर्दी खोकला
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पावसाने मोठी दैना केली. त्यानंतर पाऊस थांबला असला तरी हवेतील गारवा आणि अधूनमधून पावसाचे सुरू असलेले रिपरिप यामुळे जिल्ह्यात सर्दी ताप खोकला अशी लक्षणे असलेले रुग्ण समोर येत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. आले की त्यांना टेस्टिंग करा सांगितले जात असल्याने अनेक नागरिक दवाखान्यात जाण्याची टाळत आहेत. घरच्या घरीच काही उपचार अन नंतर डॉक्टरांकडे असे सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर उपचार तरी सुरू करा, टेस्टिंगची भीती घालू नका, अशी नागरिकांची मागणी आहे.
सोमवारी जिल्ह्यात बाधित – 644, मृत – 15, मुक्त – 1,237
सोमवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 14,29,766, एकूण बाधित 2,20,328, घरी सोडण्यात आलेले 2,07,085, मृत्यू 5,327, उपचारार्थ रुग्ण 10,083