प्रतिनिधी / इस्लामपूर
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल दरवाढी पाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. ही बाब निषेधार्ह असून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रश्नी आंदोलन हातात घेईल व ते सर्व जिल्ह्यात होईल,असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, भारतात पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढत आहे. आज केंद्र सरकारने दुसरा धक्का दिला.खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. १०:२६:२६, डीएपी यासह अन्य खतांच्या किमती वाढल्या.महागाईने लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रातील भाजपा सरकारचा आम्ही निषेध करतो.महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी आंदोलन हातात घेईल.