प्रतिनिधी / सांगली
बुधगावच्या रखडलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात बुधगाव भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री जयंतराव पाटील यांना साकडे घालण्यात आले. नवीन पाणी योजना तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री जयंत पाटील सांगली येथे आले असता बुधगाव गावचे स्वतंत्र प्रादेशिक योजना तातडीने कार्यवाही व्हावी व बुधगावमध्ये नागरिकांचे गेल्या अनेक वर्षापासून होणारे हाल व त्रास थांबविण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ हे उपस्थित होते. योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील बुधगाव शहर भाजपाध्यक्ष बजरंग भगत, मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजित गावडे व ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.