विपणन वर्ष 2021-22साठी इस्माने नेंदवला अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर रोजी समाप्त होणाऱया चालू विपणन वर्ष 2021-22 मध्ये भारताची साखर निर्यात 85 लाख टनापर्यंत पोहोचण्याचे संकेत भारतीय साखर कारखाना संघ(इस्मा) यांनी व्यक्त केले आहेत.
इस्माने म्हटले आहे, की देशाने जिथे 72 लाख टन साखर निर्यात निश्चित केली आहे, तसेच चालू मार्चच्या अंतिम क्षणापर्यंत 56-57 लाख टन साखर निर्यात झाली आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेबरपर्यंत सुरु राहतो. साखर उत्पादनाच्या ताज्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांच्या आकडेवारीमधून माहिती मिळते की, जागतिक बाजारात सध्याच्या सत्रात भारताकडून जवळपास 85 लाख टन साखर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वर्ष 2021-22 मधील मार्च महिन्यांपर्यंत साखर उत्पादन 309.87 लाख टनापर्यंत पोहोचले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 278.71 लाख टनाच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे.
प्रमुख उत्पादक
देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि
कर्नाटक राज्ये साखर उत्पादन घेण्यात अग्रेसर आहेत.
राज्य साखर उत्पादन (मार्चपर्यंत)
महाराष्ट्र…. वाढीसह 118.81 लाख टन
उत्तर प्रदेश. 87.50 लाख टन
कर्नाटक वाढीसह 57.65 लाख टन