मर्यादित वेळेनंतर सर्व दुकाने बंद. लोकांचीही वर्दळ नाही. उर्वरित दिवसही लोकांनी सहकार्य करावे – नगराध्यक्ष. लोकांकडून सरकारला आपले चुकीचे निर्णय बदल्याचा संदेश – राजेश सावळ. 12 मे पर्यंत कडक अंमलबजावणी.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी नगरपालिकेने साखळीतील व्यापारी आणि लोकांना केलेल्या सुचनेप्रमाणे मर्यादित वेळेनंतर 100टक्के लॉकडाऊन पाळण्यात आला. साखळी बाजार आणि शहरातील केवळ औषधालये वगळता सर्वच दुकाने बंदच होती. सकाळी 6 ते दु. 12 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवा देणारीच दुकाने खुली ठेवण्याची मुभा व्यापाऱयांना होती. त्याप्रमाणे दुकाने निर्धारित वेळेत भंद करून लोकांनी पूर्णपणे कडक लॉकडाऊन पाळला. या उत्स्फूर्त प्रतिसादाचे नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी स्वागत केले असून उर्वरित दिवसही अशाप्रकारे लॉकडाऊन करून या भयानक संसंर्गापासून स्वतःचा बचाव करून घेऊया, असे आवाहन केले आहे.
साखळी नगरपालिकेने मंगळ. दि. 4 मे रोजी तातडीची बैठक घेऊन साखळी नगरपालाका क्षेत्रात मर्यादित काळासाठी जिवनावश्यक सामानांची दुकाने खुली ठेऊन नंतर साखळीत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा संदेश सर्व व्यापाऱयांना आणि जनतेला देण्यात आला होता. दु. 12 नंतर सर्व दुकाने बंद ठेवावी, या नियमाचा भंग करून दुकाने उघडल्यास नगरपालिकेतर्फे संबंधित दुकानाचा व्यापारी परवाना मागे घेण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
दु. 12 नंतर कडकडीत लॉकडाऊन
साखळी नगरपालिकेच्या सुचनेप्रमाणे काल बुध. दि. 5 मे रोजी सकाळी बाजार आणि शहरातील किराणा सामान, दुध, वृत्तपत्रे, फळ, भाजी, बेकरी पदार्थ विक्री दुकाने खोलण्यात आली होती. दु. 12 व. नंतर सदर सर्व दुकाने बंद करण्यात आली. व सर्वां?नी कडक लॉकडाऊन पाळला. बाजारातील आणि शहरातील सर्वच दुकाने बंद बंद ठेवण्यात आली होती. सकाळी दुकाने उघडण्यात आल्यानंतर दुपारीनंतर या दुकानांवर लोकांनी सामान खरेदीसाठी गर्दी केल्याचे निदर्शनास आले. तरीही दुकानदार लोकांना सामाजिक सुरक्षा अंतर राखण्याचे आवाहन करीतच होते. बाजारातील आणि शहरातील केवळ औषधालयेच खुली होती. तर राष्ट्रीयीकृत बँकां?नी अर्धे शेटर ठेवून आपले अंतर्गतपणे कामकाज चालू ठेवले होते. लॉकडाऊन असल्याने या बँकांमध्ये लोकही फिरकत नव्हते. बाजारातील लोकांची वर्दळ तर बंदच झाली होती.
साखळीवासीयांचे आभार, अशाचप्रकारे उर्वरित दिवस सहकार्य करावे – नगराध्यक्ष पार्सेकर.
साखळी नगरपालिकेने अत्यंत कमी वेळात दिलेल्या हाकेला दाद देताना लोकांनी साखळीत लॉकडाऊन पाळण्यासाठी चांगलेच सहकार्य केले. त्यासाठी साखळीवासीयांचे आणि व्यापारी वर्गाचे आभार नगराध्यक्ष राया विनायक पार्सेकर यांनी मानले. पहिल्याच दिवशी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या लॉकडाऊनचे उर्वरित दिवसही जनता आणि व्यापाऱयांनी अशाचप्रकारे सहकार्य करावे आणि या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जबाबदारीने वागावे. साखळी पालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नगरपालिकेने तातडीने हा निर्णय घेतला. या निर्णयात इतर नगरसेवकांना तसेत पालिका मुख्याधिकारी दिपक वायंगणकर यांना विश्वासात घेण्यात आले होते. तरीही इतर सर्व नगरसेवकांनी पालिकेच्या या निर्णयाला सहकार्य केलेले आहे. असे नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी यावेळी म्हटले.
लोकांकडून सरकारला आपले चुकीचे निर्णय बदल्याचे संदेश – राजेश सावळ.
साखळीत लोकांनी केलेले लॉकडाऊन म्हणजे लोकांनी सरकारला त्यांचे आतापर्यंत चुकलेले आणि आताही सरकारकडून चुकणारे निर्णय दाखवून दिले आहेत. साखळी नगरपालिकेने ज्या तत्वा?वर साखळीत लॉकडाऊन जाहिर केले होते, त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यातून लोकांनी आपल्या बचावाच्या दिशेने पाऊल उचलेले असून लोकांना आज सरकारी यंत्रणांवरही जास्त ताण आणायचा नाही. कारण सरकार हि परिस्थिती हाताळण्यास फोल ठरले आहे. याचाच रोष लोकांनी स्वतः स्वेच्छा लॉकडाऊन करून दाखवून दिला आहे. आजही वेळ गेलेली नसून सरकारने आपली चुकलेले निर्णय सुधारून लोकांना अपेक्षित निर्णय द्यावेत, अशी मागणी नगरसेवक राजेश सावळ यांनी केली आहे.
सरकारी पातळीवरून 14 दिवसांचे लॉकडाऊन व्हावे – प्रवीण ब्लेगन.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी साखळी नगरपालिकेने जाहिर केलेल्या लॉकडाऊनला चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. बाजारातील आणि शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. यावरून सरकारने एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन 14 दिवशीय लॉकडाऊन जाहिर करावे. सरकार लोकांचे ऐकत नसल्याने आज लोक स्थानिक स्वराज्य संस्था?वर विश्वास ठेऊन लॉकडाऊनमध्ये सहभागी होत आहेत. आज या परिस्थितीत सरकारची व्यवस्था कोलमडली असून कोरोना रूग्णांना प्राणवायू पुरविणे मुश्कील बनले आहे. अशा महामारीत लोकांना अधिक आजारी पडू न देता लोकांची सुरक्षा जपणे गरजेचे बनले आहे. अशी प्रतिक्रिया माजी सरपंच प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केली.