सातारा / प्रतिनिधी :
भाजपचे खासदार गिरीश बापट हे सातारा दौऱ्यावर आले असून, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत निवडणूकीचा आढावा घेतला.
त्यांनतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप प्रभावीपणे उतरली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आपण मानत नाही. अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध आले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीकडे पैसा आहे, ते पैसा देऊन स्वागत करतात आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत केल्याची टिप्पणी खासदार बापट यांनी केली. नेत्यांच्या संरक्षणबाबत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादाना खास सुरक्षेची गरज नाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे, अशी टिप्पणी राज्य सरकारवर बापट यांनी केली.