प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.सातारा शहरात तर चितेंचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक वॉर्डात रुग्ण आढळून येत आहेत.मृत्युदर वाढला आहे. काल रात्री आलेल्या अहवालात चार जणांचा बळी गेला तर नव्याने 166 जण बाधित आढळून आले आहेत.
सातारा तालुका हा जिह्यात दुस्रया क्रमांकावर आहे.तो खाली आणण्यासाठी प्रशासन म्हणून सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात जिह्यातले बाधित उपचार घेत असल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे आहे.संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच मिळत नाही.त्यामुळे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पडून राहतात.कैलास स्मशानभूमीत 2 मार्च ते 31 मार्च पर्यन्त 84 अंत्यसंस्कार, 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यन्त कोरोनाचे 3 तर इतर 96, 1 मे ते 31 मे या दरम्यान कोरोनाचे 14 तर इतर 130, 1 जून ते 30 जून या दरम्यान कोरोनाचे 20 इतर 134, 1 जुलै ते 31 जुलै या दरम्यान कोरोनाचे 56 तर इतर 107, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यन्त कोरोनाचे 204 इतर 152 जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.