शिष्यवृत्ती परीक्षेचा अखेर निकाल जाहीर
प्रतिनिधी/ सातारा
राज्य परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱया शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आला. सातारा जिह्यातील पाचवीसाठी 17 हजार 543 विध्यार्थी नोंदले होते. त्यापैकी 474 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले तर आठवीसाठी 12 हजार 788 विद्यार्थी नोंदले होते त्यापैकी 473 शिष्यवृत्ती धारक बनले. राज्यात 5 वी मध्ये ग्रामीण विभागात प्रथम येण्याचा मान निनाम शाळेच्या जागृती जाधव हिने पटकावला आहे. शहरी विभागात प्रथम येण्याचा मान रहिमतपूर येथील वसंतदादा पाटील विद्यालयाची साईशा कदम हिने मिळवला आहे. आठवीमध्ये शहरी विभागात राज्यात प्रथम येण्याचा मान सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या अथर्व पवार याने पटकावला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 ला घेण्यात आली होती. तिचा निकाल 7 नोव्हेंबरला ऑनलाईन जाहीर झाला होता. तो निकाल दि. 3 रोजी जाहीर करण्यात आल्याचे बुधवारी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर सांगितले. त्यामध्ये राज्यात 5 वी मध्ये ग्रामीण विभागात प्रथम येण्याचा मान निनाम शाळेच्या जागृती जाधव हिने पटकावला आहे. शहरी विभागात प्रथम येण्याचा मान रहिमतपूर येथील वसंतदादा पाटील विद्यालयाची साईशा कदम हिने मिळवला आहे. तर शहरी भागात राज्यात दुसरा कराड पालिकेच्या शाळा नंबर मंथन थोरात आलेला आहे. आठवीमध्ये शहरी विभागात राज्यात प्रथम येण्याचा मान सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या अथर्व पवार याने पटकावला आहे. जिह्यातील पाचवीसाठी जावली तालुक्यातील 665 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 28 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. आठवीसाठी जावली तालुक्यातील 507 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. पाचवीसाठी कराड तालुक्यातील 3405 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 73 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. आठवीसाठी कराड तालुक्यातील 2328 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 85 शिष्यवृत्तीधारक बनले. पाचवीसाठी खंडाळा तालुक्यातील 854 विद्यार्थ्यांपैकी 41 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. आठवीसाठी 607 विद्यार्थ्यांपैकी 38 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी खटाव तालुक्यातील 1487 विद्यार्थ्यांपैकी 61 विद्यार्थी तर आठवीसाठी 1159 विद्यार्थ्यांपैकी 87 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी कोरेगाव तालुक्यातील 1260 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी तर आठवीसाठी 1012 विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले.
पाचवीसाठी महाबळेश्वर तालुक्यातील 448 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी तर आठवीसाठी 376 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी माण तालुक्यातील 1231 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी तर आठवीसाठी 1093 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी पाटण तालुक्यातील 1625 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थी तर आठवीसाठी 1008 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी फलटण तालुक्यातील 1464 विद्यार्थ्यांपैकी 44 विद्यार्थी तर आठवीसाठी 995 विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी सातारा तालुक्यातील 3021 विद्यार्थ्यांपैकी 73 विद्यार्थी तर आठवीसाठी 2185 विद्यार्थ्यांपैकी 69 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. पाचवीसाठी वाई तालुक्यातील 1258 विद्यार्थ्यांपैकी 51 विद्यार्थी तर आठवीसाठी 803 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले.