वार्ताहर/ ताम्हाने
सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की, आरडाओरडा करुन शांतता बिघडवल्याप्रकरणी मेघी, कडवई व माळवाशी येथील आठ जणांवर देवरुख पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवरुख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार देवरुख पोलिस ठाण्याचे पोलिस गणेश चव्हाण यांनी याबाबत याबाबत फिर्याद दिली आहे. देवरुख पोलिस ठाण्यानजीक राजेंद्र सदानंद पवार (27), युवराज मनोहर पवार (27), गजानन कृष्णा पवार (55), प्रज्योत प्रकाश दळवी (25), बाळकृष्ण बळवंत पवार (75), प्रमोद बाळकृष्ण पवार (35 सर्व राहणार मेघी), महेंद्र विठ्ठल जाधव (40, कडवई), प्रसाद प्रकाश सावंत (35, माळवाशी) हे शुक्रवारी सकाळी गचंडी करुन एकमेकांना धक्काबुक्की करत होते.
धक्काबुक्की व आरडाओरडा करुन सार्वजनिक ठिकाणाची शांतता बिघडवल्याप्रकरणी आठ जणांवर देवरुख पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम 160 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. संदेश जाधव करीत आहेत.