हिंगणी ७५ टक्के पाणीसाठा वाढला
रब्बी पिकांना होणार फायदा ; बळीराजा आनंदी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
गेल्या काही दिवसात दमदार व सतंतधार पाऊस झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणारे बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरण ओहर फ्लो झाले. यानंतर जवळगाव प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. तर हिंगणी ७५ टक्के भरले आहे. दमदार पावसाने मध्यम प्रकल्प पाणीसाठा वाढला असून यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे. तर रब्बी पिकांना फायदा होणार आहे.
हिंगणी व जवळगाव मध्यम प्रकल्पामधील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर भोगावती, नागझरी, निलकंठा या नद्या वाहू लागल्याने शेतकरी वर्गांत आनंदाचे वातावरण आहे.
हिंगणी मध्यम प्रकल्पामध्ये ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर जवळगाव प्रकल्पामध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या हिंगणी व जवळगाव मध्यम प्रकल्प धरण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने व दोन्ही नदया वाहत आहेत. हे मध्यम धरण भरल्याने भागातील शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग भागात शेतीच्या व अनेक लहान मोठ्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भोगावती नदीवरील असणारे हिंगणी मध्यम प्रकल्प व नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प जनसामान्यांसाठी संजीवणी ठरले आहेत. भोगावती व नागझरी नदीचा उगम हा मराठवाडयातील उस्मानाबाद जिल्ह्यात होऊन पश्चिमेकडे या नदया वैरागच्या दोन्ही बाजूने प्रवाहीत झाल्या आहेत. त्यामुळे या नद्यांवरील धरणातील पाण्याचा लाभ वैराग भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या काही दिवसात सतंतधार व दमदार पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही प्रकल्यातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
बार्शी तालुक्यात यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने लहान मोठे पाणलोट तलाव भरल्याने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जामिनीची पाणी पातळी वाढणार आहे. ऐकीकडे यावर्षी पाऊस मान चांगले झाले ही समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने मात्र शेतकरी धास्तावलेला आहे.