प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. बाधित रुग्णांना बार्शी, सोलापूर किंवा इतर शहराच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. परिणामी रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वैरागमध्ये नकाते मंगल कार्यालयात 50 आणि साई आयुर्वेदिक महाविद्यालयात 150 बेड क्षमतेचे मंजूर झालेले कोविड केअर सेंटर त्वरीत सुरु करावे. दि. 10 एप्रिल रोजी या सेंटरसाठी इमारतीचे अधिग्रहण झालेले आहे. मात्र त्यानंतर दहा दिवस होवूनही ते अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे स्टाङ्गसह इतर सर्व सुविधा तातडीने पुरवून हे सेंटर त्वरीत सुरु करावे, अशी मागणी माजी सैनिक जगन्नाथ आदमाने यांनी केली आहे.
वैराग व भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. भालगाव व गौडगावमध्ये तर प्रतिबंधात्मक क्षेत्रं तयार करण्यात आले होते. गेल्यावर्षी कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर वैराग भागासाठी वैराग जवळील साई आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी कोरोना केअर सेंटर निर्माण करून बार्शी शहरातील अरोग्य यंत्रणेवर येणारा वैद्यकीय सुविधांचा ताण कमी करण्यात आला होता. वैराग भागातील नागरिकांना या सेंटरमध्ये ठेवल्याने अनेकांना सोयीचे झाले होते. वैराग भागातील वैराग, गौडगाव, उपळे दुमाला, तडवळे या चार प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अनेक गावे येतात. यामध्ये वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी नागरिकांची वर्दळ जास्त असते. शिवाय वैराग, गौडगाव, उपळे दुमाला, शेळगाव या गावांची मोठी लोकसंख्या पाहता व वैराग हे व्यापारी दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हजारो लोकांची ये-जा याठिकाणी असल्याने वैराग परिसराच्या लोकांसाठी कोविड केअर सेंटरची नितांत गरज