वार्ताहर/ किणये
वाघवडे गावासाठी स्वतंत्र ग्राम पंचायतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्वतंत्र ग्राम पंचायत करण्यासाठी ठरावाच्या मुद्यावरुन मंगळवारी मार्कंडेयनगर ग्राम पंचातीची ग्रामसभा वादळी ठरली आहे.
वाघवडे, काळेनट्टी व वाल्मिकीनगर या तिन्ही गावची मिळून वाघवडे गावात स्वतंत्र ग्राम पंचायत व्हावी, अशी मागणी वाघवडे ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हापंचायत, तालुका पंचायत, ताशिलदार आदी कार्यालयामध्ये ग्रामस्थांच्यावतीने निवेदनही देण्यात आले होते. या मागणीला अनुसरुन प्रशासनाच्यावतीने ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होते.
सध्या वाघवडे गावचा मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीमध्sय समावेश आहे. गेल्या पाच वर्षापूर्वीही वाघवडे ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्राम पंचायतीची मागणी केली होती.
मंगळवारच्या ग्राम सभेला नोडल अधिकारी म्हणून प्रविण महिंद्रेकर हे उपस्थित होते. या ग्रामसभेत नागरिकांशी रितसर चर्चा करून वाघवडे गावाल स्वतंत्र ग्राम पंचायत करण्यासंदर्भात ठराव करण्यात येणार होता. पण एका माजी ग्राम पंचायत सदस्यांने उपस्थित अधिकाऱयांनाच उलट सुलट प्रश्न विचारून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वाघवडे येथील पिराजी पाटील व जोतिबा केन्नूरकर यांनी दिली.
ग्रामसभेला पीडीओ कांबळे या उपस्थित होत वाघवडे गावातील मारुती आंबोळकर, परशराम धामणेकर, शिवाजी पाटील, शंकर कोकीतकर, नामदेव पाटील, भावकाण्णा पाटील, आर. के. पाटील, नागेंद्र पाटील, जोतिबा आंबोळकर, कल्लाप्पा गुरव, जोतिबा पाटील, विष्णू पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.