सांगली \ ऑनलाईन टीम
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या १०८ वर्षीय जरीना आजी यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. ट्वीट करत जयंत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे तसेच काही फोटो देखील शेअर करत लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आमच्या इस्लामपूर शहरातील १०८ वर्षीय जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे.
लसीकरणात महाराष्ट्र आघा़डीवर आहे. राज्यात आजपर्यंत लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.