प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण सीमाभागात 17 जानेवारीला हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्यात येणार आहे. येथील सीमावासीय मागील 65 वर्षांपासून यातना भोगत असून अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण
सीमाभागात हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्यात येईल, असा ठराव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी जत्ती मठ येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस किरण गावडे हेते. प्रारंभी जे÷ पदाधिकारी नेताजी जाधव म्हणाले, मराठी भाषा व संस्कृतीसाठी येथील भाषिकांचा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. परंतु या ना त्या कारणाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतो. असे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब काकतकर म्हणाले, मागील काही दिवसांपासून नवी पिढी राष्ट्रीय पक्षांच्या मागे लागली आहे. परंतु मराठी भाषा व संस्कृती टिकवायची असेल तर म. ए. समितीशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात जे÷ नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सीमावासियांच्या आशा असून त्यांनी यातून पर्याय काढून सीमावासियांना न्याय द्यावा, असे त्यांनी सांगितले.
किरण गावडे म्हणाले, बेळगावला अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत येथील मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱया हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला अधिकाधिक सीमावासियांनी उपस्थित राहून गांभिर्याने पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
संजय मोरे म्हणाले, 17 जानेवारी हुतात्मा दिनादिवशीच देशाचे गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्न समजावून देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सुहास किल्लेकर यांनी आभार मानले. माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मोहन बेळगुंदकर, नारायण किटवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेघन लंगरकांडे, अजित कोकणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.