प्रतिनिधी/बेळगाव
मागील 20 ते 25 वर्षांपासून राजहंसगडावर एकाच पॅनेलने बाजी मारली आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील नागरिकांनी एकाच पॅनेलला साथ देऊन गावचा विकास साधला आहे. भाजपप्रणित ग्रामविकास आघाडी पॅनेल असून त्यांनी यावेळीही चांगली घोडदौड ठेवली आहे. सुळगा (ये.) ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱया राजहंसगड येथे ग्रामविकास आघाडीने आपली परंपरा कायम ठेवून पुन्हा विजय मिळविला आहे.
शाम थोरवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. राजहंसगड येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून सुमित्रा तावशे-297, जोतिबा थोरवत 305 मते घेऊन तर वॉर्ड क्रमांक 3 मधून लक्ष्मी तावशे-309 व दत्ता पवार यांनी 310 मते घेऊन विजयी झाले आहेत. यावेळी आतषबाजी व गुलालाची उधळण करत त्यांचे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले..