प्रतिदिन 4 ते 5 वाहनांतून रवाना, -मच्छीमारांना दिलासा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनच्या काळात ठप्प असलेली मासेमारी पुन्हा सुरु झाली आह़े त्यामुळे रत्नागिरीमधून शुक्रवारपर्यंत 20 ते 25 टन मासळी विविध राज्यात विक्रीसाठी रवाना झाली आह़े इन्सुलेटर वाहनामार्फत गोवा, कर्नाटक, केरळ आदी ठिकाणी ही मासळी पाठवण्यात आली आह़े प्रशासनाने आखून देण्यात आलेल्या निकषांनुसारच मासेमारी होत असून कोलंबी, बांगडा, गेदर आदी मासळी मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े
केंद्र शासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योगांना सुरु करण्याची परवानगी दिली आह़े त्यामुळे जिल्हाभरातील प्रमुख बंदरावरील कामकाजाला सुरुवात झाली आह़े मिरकरवाडा येथे सुमारे 400 हून अधिक मासेमारी नौका आहेत़ सोशल डिस्टस्निंग पाळण्यात येत आह़े गर्दी टाळण्यासाठी मासळी उतरवण्यासाठी दोन जेटींचा वापर करण्यात येत आह़े एकावेळी 2 ते 4 नौकांना मासळी उतरवण्याची परवानगी मत्स्य विभागाकडून देण्यात आली आह़े एका नौकेला साधारणपणे 8 ते 10 टप मासळी मिळत आह़े त्यामध्ये कोळंबी, बांगडा, गेदर, काप या मासळीचा समावेश आह़े कोळंबी 500 ते 600 किलो तर बांगडय़ाच्या एका टपाला 5 ते 8000 इतका दर मिळत आह़े हे मासे खाण्यासह स्थानिक बाजारासह गोवा, कर्नाटक आदी †िटकाणी पाठवण्यात येत आहेत़ यासाठी इन्सुलेटर वाहनाचा उपयोग करण्यात येत आह़े दरदिवशी 4 ते 5 इन्सुलेटर वाहने विविध राज्यात रवाना होत आहेत. तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार बंदरावरील कामकाज सुरु असल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े
स्थानिक बाजारामध्येही खवय्यांसाठी मासळी उपलब्ध होत आह़े त्यामुळे मासळी खरेदीसाठी सोशल डिस्टस्निंग पाळून खरेदी करण्यात येत आह़े तसेच मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरु केल्यामुळे मच्छीमार व मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणाऱयांना दिलासा मिळाल्याचे चित्र आह़े