जागतिक सुविधेत राहणार 7 हजार लोक
मानवांची संख्या वाढण्यासह त्या हिशेबानुसार आता जमिनीसह पाण्यावरही राहण्याचे नियोजन केले जात आहे. याचकरता एका तरंगणाऱया शहराची कल्पना मांडण्यात आली आहे. पाण्यावर तयार करण्यात आलेले हे शहर हजारो लोकांचे वास्तव्यस्थान असू शकते. सागरी मासा मंता रे याच्या आकारात हे शहर असणार आहे. सध्या या शहराची केवळ संकल्पना मांडण्यात आली आहे. हे शहर साई-फाई फिल्ममधील शहर असल्यासारखे याचे मॉडेल पाहून वाटते. 7 हजार लोकांसाठी हे शहर सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. खुल्या समुद्रात फिरणारे हे शहर असल्याने तेथे संशोधनही करता येणार आहे.
सिटी ऑफ मरीन्सला मंता रे च्या स्वरुपात डिझाइन केले आहे. कारण अशाप्रकारच कम्युनिटीसाठी हे सर्वोत्तम ठरणार आहे. हे शहर सर्वसामान्य लोकांपेक्षा सागरी जीवनाचा शोध घेऊ इच्छिणाऱया संशोधक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आल्याचे उद्गार प्रेंच आर्किटेक्ट जॅक्स रॉगेरी यांनी काढले आहेत. या शहरात जगभरातून आलेल्या लोकांचे स्वागत होणार आहे. येथील कायदा-सुव्यवस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या मापदंडांच्या आधारावर राहणार असल्याचे ते म्हणाले.
शहराची वैशिष्टय़े
हे शहर पाण्याखील असणार आहे, याचमुळे सागरी अध्ययनाच्या जगतात क्रांतिकारक बदल घडवून आणता येणार आहे. येथे राहणाऱया लोकांचा महासागरासोबत स्थायी संपर्क असणार आहे. या शहराची एकूण लांबी 900 मीटर आणि आणि रुंदी 500 मीटर इतकी असणार आहे. शहराच्या एका हिस्स्यात 90 मीटर लांबीच्या पाणबुडय़ा असतील, त्यांचा संशोधनासाठी वापर करता येणार आहे. या शहरात एक मोठा लेक्चर हॉल, वर्गखोल्या, प्रयोशगाळा आणि स्पोर्ट्स झोन असेल. या शहराकरता सागरी ऊर्जेचा वापर होणार असल्याचे रौगेरी यांचे सांगणे आहे.
2050 पर्यंत होणार सुरुवात या शहराची संकल्पना 13 वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. 2050 पर्यंत यावरील काम सुरू होऊ शकते. अशाचप्रकारची संकल्पना मालदीवमध्येही मांडण्यात आली आहे, तेथे 5 हजार घरांचे तरंगते शहर वसविले जाणार असून यात सुमारे 20 हजार लोक राहत असतील. तेथे सर्व गोष्टी पूलाद्वारे परस्परांशी जोडलेल्या असणार आहेत.