ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून चिघळला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातून हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 14 डिसेंबरला सीमाप्रश्नावर दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
सीमावादार तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश होता. या भेटीनंतर शाह यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. या बैठकीनंतर केंद्रातून या वादावर हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते.
अधिक वाचा : नासाचं ‘मिशन मून’ पूर्ण; 26 दिवसांनी पृथ्वीवर परतलं ओरियन अंतराळयान