प्रतिनिधी /पणजी
चिंचोळे पणजी दत्त मंदीर परिसरात सांडपाणी प्रवाहित करणारी एक वाहिनी फूटून ती सर्वत्र पायवाटेवर व रस्त्यावरुन गेले. 8 दिवस गटाराचे दुर्गंधीग्रस्त पाणी वहात असून कोणीही त्याची दुरुस्ती करण्यास येत नाही याबाबत त्या परिसरातील मंडळीनी तिव्र नापसंती व्यक्त केली आहे.
दत्त मंदिरात प्रवेश करणारी अनेक मंडळी या रस्त्यावरुन चालत पुढे मंदिरात जातात. जात असताना गटाराच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहातूनच त्यांना पुढे जावे लागते. या गटाराच्या पाण्याने दुर्गंधीमय असे वातावरण झालेले असून जनतेच्या भावनांचा तरी पणजी महापालिकेने व या प्रभागातील नगरसेवकाने विचार करावा व त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.