ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patna) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी गंगा नदीत (Ganga River) एक बोट उलटून ६ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. तर यात १५ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. या बोटीत एकूण २१ जण होते. बेपत्ता असलेल्या ६ जणांचा जीवरक्षक पथक शोध घेत आहे. (bihar boat capsizes in ganga river in patna six people missing १५ rescued)
दिवाळीच्या एक दिवस पाटणामध्ये रविवारी सकाळीच गंगा नदीत एक बोट उलटली. या बोटीवर एकूण २१ जण होते. त्यापैकी १५ जणांची स्थानिक गोताखोरांच्या मदतीने सुटका करण्यात आली. तर ६ जण बेपत्ता आहेत. गोताखोरांचे पथक त्याचा शोध घेत आहे. दिघा येथील जेपी सेतूच्या १० क्रमांकाच्या खांबाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती एसडीआरएफ टीमला देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

हे ही वाचा : शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत करा; उद्धव ठाकरेंची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजता हा अपघात झाला. बोट उलटताना पाहून नागरिकांना वाचवण्यासाठी बोटीसह नदीवर गेलो आणि जमेल तेवढ्या लोकांना वाचवले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. गंगेच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. गंगाजल घेण्यासाठी १२ ते १३ जण बोटीवर बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने दुसऱ्या बोटीतून त्यांची सुटका करण्यात आली. त्याच बोटीतून काहीजण वाळूची वाहतूक करत होते. बोट खांबाला धडकल्यावर पोहायला जाणणाऱ्या ७ ते ८ जणांनी स्वतः उडी मारून पळ काढला. पोलिसांच्या भीतीने त्यांनी नदीच्या पलीकडे धाव घेतली.