ऑनलाईन टीम/तरुण भारत
मविवा सरकारने राज्य विद्यापीठांमधील कुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भातील अधिकार कमी करून शिक्षणमंत्र्यांना दिले होते. आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यापालांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने कुलगुरू निवडीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून टाकले होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) आता पुन्हा ठाकरेंना धक्का देत त्यांचा निर्णय बदलला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही टीका केली आहे. ज्यांना मुंबईतील रस्त्यांवरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे! अशा शब्दांत आशिष शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता, असं ट्विट आशिष शेलारांनी केलं आहे.
“पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!” असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी “विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले! विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले. पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार! ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!” असं देखील शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेलार यांनी याआधीही वेदांत-फॉक्सकॉनवरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.