ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा भाजपला नक्कीच फायदा झाला आहे. मात्र, यावर मला जास्त भाष्य करायचे नाही. ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया चिंचवड विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणू निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांनी दणदणीत विजय संपादन केला. 2,87,145 मतांपैकी जगताप यांनी 1,35,434 इतकी मते मिळवली. या विजयानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अधिक वाचा : चिंचवडचा गड भाजपने राखला; अश्विनी जगताप 36,168 मतांनी विजयी
त्या म्हणाल्या, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप गेले, पण त्यांचा गड आलेला आहे. जनतेने हा गड राखलेला आहे. विजयाची ही नांदी सगळय़ांनी नोंदवली आहे. माझा या निवडणुकीसंदर्भात पहिल्यापासून आत्मविश्वास होता. लक्ष्मण जगताप यांना हा विजय मी समर्पित करीत आहे. सर्वसामान्यांची आमदार म्हणून मी काम करत राहणार आहे.