प्रतिनिधी /वाळपई
वाळपई भागातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळी मोसमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊन पुराची परिस्थिती होऊ नये याची विशेष दखल घेण्यात आलेली आहे?.
जलसिंचन खात्यातर्फे आवश्यक स्तरावर काळजी घेण्यात आली असून पावसाळी मोसमामध्ये अडचणी निर्माण झाल्यास यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत विशेष ध्यान देण्यात येणार असल्याची माहिती वाळपई जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांनी दिली आहे.
पावसाळी मौसमाला अवघेच शिल्लक राहिलेले आहेत. सत्तरी तालुक्मयातील अनेक नद्यांमध्ये गाळ साचून अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पावसाळी मोसम मध्ये पूर येण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नव्हती. यामुळे जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी दिलेल्या निर्देशानुसार वेगवेगळय़ा नाल्यातील अडथळे दूर करण्यात आलेले आहेत.
जलसिंचन खात्यातर्फे अनेक नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबविण्यात आलेली आहे. मात्र बांधण्यात आलेल्या अनेक बंधाऱयाच्यामध्ये लाकडे व गाळ साचून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्मयता होती.
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी निर्माण असलेली घाण दूर करण्यात आलेली आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱहास होणार नाही याची विशेष दखल घेण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यासाठी वाळपई नगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे खात्याचे डिचोलीचे कार्यकारी अभियंता के पी नाईक यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्यामुळे हे शक्मय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.