ऑनलाईन टीम/तरुण भारत
रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये (Shrivardhan) समुद्रकिनाऱ्यावर एका संशयास्पद बोटीत तीन एके-४७ रायफली आणि हरिहरेश्वरमध्ये एका बोटीतून लाइफजॅकेट व इतर संशयास्पद साहित्य आढळल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे. संशयास्पद दोन बोटी आढळल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी किनारपट्टीच्या भागात अलर्ट जारी केला असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.
हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळलेली ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत या बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल आणि रायफलच्या बुलेट्स आढळल्याची माहिती मिळत आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळले. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : जम्मू- काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय- मेहबूबा मुफ्ती
काही दिवसांपूर्वीच पोलिसांना कोकणच्या किनाऱ्यांवर काही संशयास्पद बोटी आढळून आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागांमध्ये गस्त वाढवली होती, त्यानंतर आता श्रीवर्धनच्या किनारपट्टीत एका बोटीतून तीन एके-४७ जप्त करण्यात आल्या आहेत.