एसडीआरएफ-अग्निशमन जवानांना प्रशिक्षण : हवामान खात्याकडून जिल्हय़ात मुसळधार पावस
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही वर्षात मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्हय़ात पुराने थैमान घातले होते. विशेषतः कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय, मलप्रभा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गावांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी बचावकार्य राबवत आपत्ती निवारण विभागाने नागरिकांचे जीव वाचविले होते. यावषीही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आपत्ती निवारण पथक सज्ज आहे. बेळगावमधील एसडीआरएफ व अग्निशमन जवानांना तसे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हवामान खात्याने यावषीही बेळगाव जिल्हय़ात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती निवारण यंत्रणा आतापासूनच सज्ज झाल्या आहेत. मान्सून दाखल झाला असून, सध्या तुरळक सरी कोसळत असल्यातरी पुढील धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे.
2019 मध्ये दांपत्याला जीवदान
बेळगाव तालुक्मयातील सुळेभावी नजीकच्या कबलापूर गावात 2019 मध्ये एक दांपत्य पुराच्या पाण्यात अडकले होते. पुराचे पाणी अधिक असल्यामुळे त्यांची सुटका करणे जिकिरीचे काम होते. दोन दिवस या दांपत्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे त्याला यश आले नाही. अखेर तिसऱया दिवशी एनडीआरएफ, एसडीआरएफ व अग्निशमन जवानांनी संयुक्तरित्या जीव धोक्मयात टाकून त्या दांपत्याला बाहेर काढले होते.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
मागील तीन ते चार वर्षांत बेळगाव परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. बचावकार्य राबवत त्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. नागरिकांनीही या बचावकार्यात सहकार्य करणे गरजेचे आहे. बऱयाचवेळा घरे खाली करा असे सांगून देखील नागरिकांचा विरोध सुरू असतो. त्यामुळे असे प्रकार यापुढे घडणार नाहीत याची काळजी नागरिकांनी घ्यावी.
– व्ही. एस. टक्केकर, (ठाणाधिकारी, अग्निशमन विभाग)