Election 2022 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच म्हणजेच जुन्याच पद्धतीने होणार असून नवी रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला शिंदे सरकारने मोठा धक्का दिला आहे. तसेच हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. तसेच मविआ सरकारने वाढविलेल्या वॉर्ड संख्या नियमबाह्य असल्याने ते रद्द करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत. मुंबई पालिकेमध्ये सदस्य संख्या २२७ चं राहणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकित घेण्यात आला आहे.
हेही वाचा- शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार; लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार
वाॅर्ड पुनर्रचना रद्दचे परिणाम काय होतील?
-मुंबईत वाॅर्ड पुनर्रचनेचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो.
-मुंबईत वाॅर्डची संख्या २२७ च राहणार. याचा परिणाम शिवसेनेवर होईल.
-वाॅर्ड पुनर्रचना आणि वाॅर्डची संख्या वाढवण्याचा निर्णय मविआने घेतला होता.
-आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेनेला या सर्वाचा फटका बसू शकतो.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन