जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने अग्निपथ योजना जारी केल्यानंतर संपूर्ण देशातून त्याला तीव्र विरोध होत आहे. बेळगाव मधील काही संघटनांनी त्याला विरोध केला आहे. भारतीय कृषक संघ आणि कामगार संघटनांनी त्याला विरोध केला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धगौडा मोदगी, मंदा नेवगी, राजश्री गुरण्णावर, ए.जी.कुलकर्णी यांच्यासह शेतकरी व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.