प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कणबर्गीत भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना भीतीच्या छायेखाली ये-जा करावी लागत आहे. विशेषतः मुख्य मार्गावरच कुत्र्यांचे कळप बसत असल्याने अपघात वाढले आहेत. मनपाने भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मनपा केवळ दिखाऊपणा करून कुत्र्यांसाठी नसबंदी मोहीम राबवते मात्र या मोहिमेत सातत्य नसल्याने शहरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः अलिकडे भटक्मया कुत्र्यांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीती वाढली आहे. कणबर्गी मेन रोड, पाटील गल्ली, सिद्धेश्वर रोड, इंडॉल रोड आदी भागात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळकरी मुले अणि नागरिकांना नाहक त्रस सहन करावा लागत आहे.
नसबंदी मोहीम राबविण्याची मागणी
रस्त्याच्या दुतर्फा कुत्र्यांचा कळप बसत आहे. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱया वाहनधारकांच्या पाठीमागे कुत्री धावत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. कुत्र्यांची संख्या अलीकडे झपाटय़ाने वाढली असून, नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे मनपाने तातडीने नसबंदी मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.