सांगली प्रतिनिधी
सोमवार 11 जुलै पासून 15 तारखेपर्यंत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात अतीमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच नद्यांच्या विसर्गतेमुळे सांगली आणि उत्तर कर्नाटकात सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अधिक वाचा- आमदार नारळ फोडून जाताच, मटण मार्केटच्या वादातून मिरजेत दोन गटात राडा
हवामान खात्याने सोमवारी दुपारी एकच्या सुमारास याबाबतचा अंदाज दिला असून 15 रोजी खूप अधिक पाऊस पडेल आणि तो घाट क्षेत्राबरोबरच आसपासच्या भागात ही पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या भागात पावसाने जोर धरला असून धरणक्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने धरणे भरू लागले आहेत. या नव्या अंदाजामुळे वाढणाऱ्या पाणी पातळीचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती नियोजन विभागाला करावे लागणार आहे
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांतील पाण्याच्या विसर्गामुळे सांगली तसेच बेळगांव जिल्ह्यातील नदीकाठची गावेही प्रभावित होत असल्याने दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात सतर्कतेचा इशारा दिला जात असतो.