वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत पुढील पाच-सहा वर्षांसाठी परकीय चलनाच्याबाबतीत समाधानकारक स्थितीत राहील असे वाणिज्य मंत्री गोयल यांनी म्हटले आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना गोयल म्हणाले, ‘भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे आणि पुढील पाच-सहा वर्षात वाईट परिस्थितीत देशाच्या सर्व गरजा पूर्ण करेल. ती समाधानकारक स्थितीत राहणार असल्याचेही संकेत यावेळी दिले आहेत.’ 12 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाचा साठा जवळपास 600 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. गोयल म्हणाले की, जगातील अनेक देश भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. जागतिक व्यवस्थेत भारताचे महत्त्व वाढत असल्याचे हे द्योतक आहे.
1 लाख कोटी वस्तूंची निर्यात, 1 लाख कोटी सेवांचे उद्दिष्ट
जवळपास एका दशकात एकूण निर्यात सुमारे 500 अब्ज डॉलर होती आणि गेल्या वर्षी 676 अब्ज डॉलरची झाली. आर्थिक वर्ष 23 मध्ये एकूण निर्यात 776 अब्ज डॉलर होती. यामध्ये वस्तूंची निर्यात 450 डॉलर आणि सेवांची निर्यात 326 डॉलर होती. ते म्हणाले की व्यवसायांनी पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागीदार शोधले पाहिजेत.