शिवसेना संपर्क नेते राजेश क्षीरसागर यांचे मत
प्रतिनिधी/ सातारा
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेची बांधणी करण्यासाठी जिल्हय़ात आलेलो आहे. लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सातारा जिह्यात शिवसेनेचे भक्कम असे चित्र आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा शिवसैनिक या जिह्यात आहे. स्वतः झुणकाभाकर खाऊन समाजाची सेवा करणारा शिवसैनिक हीच पक्षाची ताकद आहे. जे वरिष्ठ लोकसभेला उमेदवार देतील त्यांनाच निवडणूक आणण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करतील. तसा जो निधी अखर्चित आहे तो निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्री सक्षम आहेत, असे प्रतिपादन क्षीरसागर यांनी केले. दरम्यान, संजय राऊत यांना लोक कंटाळली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, आता शिवसेनेचे चांगले चित्र आहे. जिह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण विधानसभा मतदार संघ, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा मतदार संघ शिवसेनेचा आहे. तीन जिल्हा प्रमुख चांगले काम करत आहेत. जिह्यात शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. पक्ष बांधणीसाठी जिल्हय़ात आलो आहे. लवकरच धनुष्यबाण यात्रा सातारा जिह्यात येणार असून त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर आणि जंगी सत्काराचे नियोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थंसकल्पामध्ये साताऱयाला झुकते माप दिले आहे. नियोजन मंडळाचा राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून डीपीसीचा आढावा घेतला. सरकार बदलाच्या वाऱयामुळे अखर्चित निधी राहिलेला आहे. तो खर्च करण्यासाठी पालकमंत्री सक्षम आहेत. नियोजन करुन 22 पर्यंत हा प्रश्न मार्गी लावतील. कोणत्याही प्रकारचा निधी माघारी जाणार नाही, असा दावा करत क्षीरसागर यांनी पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नावर ते पुढे ते म्हणाले, मला लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची याचा अधिकार नाही. परंतु जे वरिष्ठ उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय व्हायला नको याला मी प्रथम प्राधान्य देणार आहे. निवडणुका आल्या की शिवसेनेकडे तिकीट मागण्यांसाठी रांग असते. शिवसेनेला जनाधार आहे, असे सांगत त्यांनी एका प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. पुढेही आम्ही त्यांनाच पाहू, असाही दावा त्यांनी केला. शिवसेना हे एक कुटुंब आहे. कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला ताकद देण्याचे काम आमच्याकडून होत आहे. पूर्वी शह काटशहाचे राजकारण चालयाचे, एकमेकांना जिरवाजिरवीचे आणि पाडापाडीचे राजकारण चालत होते. आता तसे नाही. आम्ही भाजपा सेना एकत्र एकदिलाने आहोत, असे त्यांनी सांगितले.
राऊतांना लोक कंटाळले आहेत
गतवर्षी कोल्हापूरात राऊत आले होते. तेव्हा प्रत्येक चौकाचौकात र्बैनर कायंकर्त्यांनी लावले होते. आता बॅनरही नाही आणि सभा सुद्धा एका छोटया हॉलमध्ये घेतली होती. त्यालाही लोक नव्हती. राऊतांना लोक कंटाळली आहेत, असे सांगत क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेत व्याख्यान देणाऱयांची गरज नाही तर मावळय़ांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.